टी - २० सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं आर्यलंडला ३३ धावांनी पराभूत केलं. यामुळं ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० अशा आघाडीवर आहे. डब्लिनमध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं १८६ धावा केल्या. आर्यलंडचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १५२ धावा करु शकल्या. ऋतुराज गायकवाडनं ५८ आणि संजू सॅमसननं ४० धावा केल्या. तिसरा सामना बुधवारी होणार आहे. (AIR NEWS)