A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

News

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल मुंबईत झालेल्या मर्यादित षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 188 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 61 चेंडू राखत उद्दिष्ट पूर्ण केले. भारताकडून मोहमद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 गाडी बाद केले.

फलंदाजीत भारताची सुरुवात डळमळीत झाली होती. मात्र के एल राहुलच्या नाबाद 75 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतला दुसरा सामना उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. (AIR NEWS)

6 Days ago