आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे प्रमुख परेश बरुआला शांती चर्चेसाठी आवाहन केले आहे. तसेच समाजातल्या सर्व घटकांना राज्यात शांती आणि स्थैर्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या बोडोलँडच्या बंडखोरांचे त्यांनी स्वागत केले. काल कोक्राझार इथे आयोजित बोडोलँड दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बंडखोर मुक्त आसामचे त्यांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. (AIR NEWS)