आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आज सिलचर आणि बराक इथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. बराक नदीच्या पाण्याचा स्तर वाढल्यामुळे सिलचर इथंपुराच्या पाण्याची पातळी 8 मीटरहून अधिक झाली आहे.
सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे. लष्कर, राज्य तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (IMPUT FROM AIR )