क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत २०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून, यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं आणि क्षयरोग मुक्तीसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज क्षयरोग मुक्त अभियान कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होत्या. या अभियानानंतर्गत जनतेनं या अभियानात सहभागी होऊन, युद्ध स्तरावर काम करत भारताला क्षयरोग मुक्त करायला हवं असं त्या म्हणाल्या. (AIR NEWS)