छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतल्या पात्र उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं.
यवतमाळ जिल्ह्यातल्या एक लाख २८ हजार ४६४ शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नसल्याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ज्या पात्र लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत त्यांना या महिनाअखेर पर्यंत अनुदान देण्यात येईल असं सावे यांनी सांगितलं. (AIR NEWS)