तिरंगी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. थोड्याच वेळात म्हणजे आठ वाजून चाळीस मिनिटांनी हा सामना सुरु होईल.
यात सहभागी असलेल्या भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एका सामन्यात हार पत्करली असल्यानं सर्वांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत.
भारतीय महिला संघानं याआधी इंग्लंडबरोबर झालेला सामना गमावला होता. येत्या 21 तारखेपासून ऑस्ट्रेलियात सुरु होणार्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं ही मालिका महत्वाची मानली जात आहे. (AIR NEWS)