दिल्लीतल्या वाढत्या वायु प्रदुषणावरचा एक उपाय म्हणून, दिल्लीत आजपासून १५ नोव्हेंबर पर्यंत, रविवार वगळून, सकाळी ८ ते रात्री आठ या वेळेत वाहनांसाठीचं सम-विषम सूत्र लागू असणार आहे. या काळात सम तारखांना सम वाहन क्रमांकाच्या गाड्या, तर विषम तारखांना विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच वाहतूकीची परवानगी असेल.
हा नियम सी.एन.जी.वर चालणाऱ्या खाजगी वाहनांनाही लागू आहे. मात्र दुचाकी वाहनं, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी वापरली जाणारी वाहनं महिला आणि शाळेच्या मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांना हा नियम लागू नसेल.
नियम मोडला तर १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी २ हजार अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णयही दिल्ली सरकारनं घेतला आहे. (AIR NEWS)