पाटणा : बिहारच्या जनतेवर मेंदूज्वराबरोबरच उष्माघाताचे संकट ओढावले आहे. दोन दिवसांत उष्माघाताने तब्बल १४३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ७७ जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या शनिवारी ६६ लोक उष्माघाताने दगावले होते. आतापर्यंत एकूण १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. उन्ह्याचा तडाखा कायम असल्याने पाटणा, औरंगाबाद, नवादा, गया येथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिहारमध्ये उष्माघाताची सर्वांधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली. येथील ३३ जणांचा मृत्यू झाला. पाटणा येथे ११, नवादा १२, गया ९, बक्सर ७ आणि आरामध्ये ५ जणांचा उष्माघाताने बळी घेतला आहे. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे काल रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. राज्यातील अन्य ठिकाणीही तापमानाचा पारा अधिक वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाने उपाययोजना केल्या आहेत. जे रुग्ण रुग्णालयात येत आहेत; त्यांच्यासाठी एसी, एअर कुलर, पंख्यांची व्यवस्था करा, असे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांत बिहारमध्ये उन्ह्याचा तडाखा कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्ह्याचा तडाखा कायम असल्याने पाटणा, औरंगाबाद, नवादा, गया येथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शहरातील तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सियस दरम्यान आहे.
(PRAHAAR)