म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या सुमारे ४५ नागरिकांची भारतानं सुटका केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्विटमध्ये दिली.
आणखी काही भारतीय नागरिकांची या जाळ्यातून सुटका केली असून त्यांच्या परतीसाठी कायदेशीर औपचारिकता सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. दुबईमध्ये मुलाखतीत निवड झालेल्या व्यक्तींना जबरदस्ती म्यानमारला नेऊन निनावी कंपन्यांमध्ये काम करण्यास भाग पाडलं अशी माहिती सुटका करण्यात आलेल्या एका व्यक्तीनं दिली. (AIR NEWS)