राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७५ हजार ९०४ झाली आहे.
या संसर्गानं काल कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८२७ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ७१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २७ हजार ४४३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. बीड जिल्ह्यात सध्या १३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एक सक्रीय रुग्ण असून, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात सध्या एकही उपचाराधीन रुग्ण नाही. (AIR NEWS)