निर्बंध कडक करूनही महाराष्ट्रातला कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे; हा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कडक टाळेबंदी लावली जाणायची शक्यता असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबत घोषणा करतील असं टोपे म्हणाले. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आणखी गती देऊन वेळ पडली तर केंद्राच्या परवानगीनं परदेशातूनही लस खरेदी केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं. (AIR NEWS)