राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे. राज्यात आज ३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली, ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७० हजार ९५१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २० हजार ४७४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ७५२ रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात २ हजार ७२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (AIRNEWS)