राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून १ किलोमीटर पेक्षा पेक्षा अधिक तर ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ३ किलोमीटर, आणि ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे. (AIR NEWS)