देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, आज सकाळपासून सुमारे २९ लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१५ कोटी ९७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात १८ कोटी ८२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
राज्यात आज सकाळपासून ३८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. (AIR NEWS)