संत वाड्मयाच्या अभ्यासक आणि लेखिका वसुंधरा बनहट्टी यांचं काल पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. वसुंधरा बनहट्टी यांनी श्री संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत सखू, आदी संतांवर आणि त्यांच्या वाड्मयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलं. त्यांचे लेखनप्रसाद, युगबोध, रसिक प्रसिद्ध झाले. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या त्या पत्नी होती. (AIR NEWS)